मा. आमदार श्री.दत्तात्रय अच्युतराव सावंत, जुलै २०१४ मध्ये झालेल्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांना विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये काम करता आले. विधान मंडळातील सर्व राजकीय पक्षाने तालिका सभापती म्हणून त्यांची निवड झाली त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या व शिक्षकांच्या प्रश्नावर शासनाला निर्णय घेण्यासाठी भाग पाडता आले. अजूनही अनेक प्रश्नावर त्यांचा पाठपुरावा चालू आहे. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाही मार्गाने त्यांचे प्रयत्न चालू आहेत.
शेतकरी कुटुंबातल्या सामान्य व कोणतंही राजकीय पाठबळ अथवा वारसा नसणाऱ्या कार्यकर्त्याला सहकार्यांच असं सच्च बळ मिळालं तर काय होऊ शकत याचं जागृत उदाहरण म्हणजे मा. आमदार श्री.दत्तात्रय अच्युतराव सावंत. शिक्षक पेशात काम करताना ऋषिमुनिंपासून साधूसंतांपर्यंत सर्वच ठिकाणी माहिती सांगणाऱ्या या शिक्षण क्षेत्रात प्रचंड बौधिकता आणि अभ्यासू नेत्यांची संख्या असताना, शासनाची हि उदासिनता का? या प्रश्नाने त्यांचे जीवन प्रश्नार्थक होतं? आंतरिक तळमळ व कार्यकर्त्यांचे मोठं पाठबळ आणि हातावर भाकर खायला तयार असणारी अनमोल मनाची सच्ची फौज, या साधनांची मैदानात उतरलेल्या त्यांच्यासारख्या शिक्षकाने वस्तूस्थिती लक्षात घेऊन, त्यांनी शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नावर कायम आधार घेतला तो पाच Wh चा. When,Why,Where,What,Who याचा त्यांच्या जीवनात त्यांनी सातत्याने वापर केला. हे असचं का? हे का नाही? आणि हेच व्हायला पाहिजे या प्रश्नांचा त्यांनी पाठलाग केला.
आमदार होण्यापूर्वी त्यांनी रस्त्यावरचा लढा उभारून विविध आंदोलने, उपोषणे करून ६०,००० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना वेतन अनुदान मंजूर करून घेतले. गेले साडे पाच वर्षे सातत्याने काम करून विधिमंडळात विक्रमी प्रश्न सोडविण्याचा आमदार साहेब प्रयत्न करत आहेत. विविध आंदोलने, उपोषणे केली व ४११५३ कर्मचारी बंधू भगिनींना वेतन अनुदान मंजूर करून देण्यात आमदार साहेब यशस्वी झाले आहेत.
आमदार साहेबांनी केलेल्या कामांची यादी खालील प्रमाणे आहे.
असे एक ना अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार साहेब दररोज चोवीस तासांपैकी किमान १६ ते १८ तास दररोज काम करत असतात.आमदार साहेबांनी आतापर्यंत अनेकदा शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे, आझाद मैदान मुंबई, संचालक कार्यालय, विधानभवन मुंबई येथे आंदोलने, उपोषणे करून अनेक विषय मार्गी लावले आहेत.सगळेच प्रश्न सुटतील असे आमदार साहेब मुळीच म्हणत नाहीत परंतु काही प्रश्न सुटण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. अनेक वर्षापासून शाळांचे बंद असलेले वेतनेतर अनुदान मिळवून दिले आहे. सर्व शाळांचे वेतन दर महिन्याचे १ तारखेला मिळविण्यासाठी शासन आदेश पारित करून घेतला आहे. वैद्यकीय बिले कॅशलेस योजनेतून मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालूच आहेत.